सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील श्रीरामाचे चरित्र आणि त्यातून मिळणारी शिकवण यांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. सुग्रीवाच्या किष्किंधा नगरीत राम-हनुमान भेटीचा प्रसंग लवकरच पडद्यावर उलगडणार आहे. रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर सीतेचा शोध घेत घेत राम आणि लक्ष्मण लंकेच्या दिशेस जाताना किष्किंधा नगरीत येतात. येथे हनुमान श्रीरामाचा एकनिष्ठ सहकारी बनतो आणि सीता मातेला शोधण्याच्या श्रीरामाच्या कामात त्यांना मदत करतो. त्या दोघांची भेट ही रामायणातील एक लक्षणीय घटना आहे, कारण त्या क्षणी राम आणि हनुमान जे एकत्र आले ते कायमचेच! दशानन रावणाला युद्धात मारण्यासाठी देखील या रामभक्ताने महत्त्वाची भूमिका निभावली.
प्रोमो येथे बघा:
सध्या सुरू असलेल्या कथानकाविषयी बोलताना रामाची भूमिका करणारा अभिनेता सुजय रेऊ म्हणाला, “अशी काही दृश्ये असतात, जी तुमच्या आत्म्याला स्पर्शून जातात आणि एक अभिनेता म्हणून राम आणि हनुमानाच्या मिलनाच्या दृश्याने मी भारावून गेलो. प्रत्येक दृश्य हे त्या दोघांच्या अतूट नात्याची साक्ष देते आणि ते काळाच्या मर्यादा देखील पार करते. भक्ती आणि शक्तीच्या धाग्यांनी हे नाते विणलेले आहे. चेहऱ्यावर प्रोस्थेटिक्स असताना देखील निर्भय ज्या पद्धतीने भावना अभिव्यक्त करतो, ते बघून मी चकित होतो. ते खरोखर खूप अवघड असते. त्याच्या मेहनतीला मी दाद देतो.”
या प्रसंगविषयी आपले विचार मांडताना हनुमानाची भूमिका करणारा अभिनेता निर्भय वाधवा म्हणतो, “राम-हनुमानाच्या मिलनानंतर आमचा एक अलौकिक प्रवास सुरू झाला आहे, ज्यातील प्रत्येक क्षण भक्तीने, निष्ठेने आणि हिंमतीने भारलेला आहे. भगवान श्रीराम आणि त्यांचा परमभक्त यांचे हे नाते आहे! सुजयचे व्यक्तिमत्व खूप शांत आणि प्रसन्न आहे, जे त्याने साकारलेल्या श्रीरामाच्या भूमिकेतून जाणवते. शिवाय त्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो, त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना खूप छान वाटते.”
बघत रहा, ‘श्रीमद् रामायण’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!